नागपूर:उत्तर प्रदेशात लग्न समारंभ सुरु असतांना एक दुर्दैवी घटना घडली. कुशीनगर येथे बुधवारी रात्री ८. ३० च्या दरम्यान १३ महिलांचा लग्नघरी दुर्दैवी मृत्यू झाला.
नैरंगिया शाळेच्या मैदानात लग्न समारंभ सुरु होता. याच ठिकाणी रात्रीच्या वेळी हळदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच सभोवताल एका विहीर होती, त्यावर जाळी लागली होती. काही महिला जाळीवर चढल्या. महिलांच्या वजनाने जाळी खाली विहिरीत कोसळली आणि एकामागे एक १३ महिला विहिरीत पडल्या. महिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असे ग्रामस्थांनी सांगितले पण रात्रीच्या वेळी अंधार असल्याने किती जणी विहिरीत पडल्या आहे ते कळून येत नव्हते. काही वेळाने टॉर्चचा उजेड पडल्यानंतर अनेक जणी विहिरीत पडल्याचे दिसून आले.
यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
UP | 13 women have died. The incident occurred last night at around 8.30 pm in the Nebua Naurangia, Kushinagar. The incident happened during a wedding program wherein some people were sitting on a slab of a well & due to heavy load,the slab broke: Akhil Kumar, ADG, Gorakhpur Zone pic.twitter.com/VaQ8Sskjl2
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 17, 2022
पोलिसांनी 13 जणींचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महिलांची ओळख पटायला वेळ लागेल, असे सांगितले जाते. कुशीनगर मधील या घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेश के कुशीनगर में हुआ हादसा हृदयविदारक है। इसमें जिन लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मैं अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। इसके साथ ही घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं। स्थानीय प्रशासन हर संभव मदद में जुटा है।
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2022