1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाला भीषण आग

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत झिरो माईल पासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काटोल रोड स्थित बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय लगत असलेल्या जंगलाला रविवार (२२ मे) रोजी अचानक आग लागली. आगीत शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले. या घटनेचे वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांसोबत वन अधिकाऱ्याने अभद्र व्यवहार केला. त्यामुळे, पत्रकारांना हवी तसे वार्तांकन करता आले नाही. या भीषण आगीमुळे उद्यानातील वन्यजीवांमध्ये अफरातफरी माजली होती.

सविस्तर वृत्त असे की, नागपूर शहरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला रविवार (२२ मे) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना एका पत्रकाराच्या लक्षात आली. तो पत्रकार या उद्यानालगतच राहतो. या घटनेचे माहिती त्या पत्रकाराने वन अधिकाऱ्यांना दिली. एक ते दीड तासानंतर फायर ब्रिगडचे वाहन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात पोहचले. तो पर्यंत शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले होते. आग इतकी भयानक होती की आकाशात आगीचे गोळे दिसत होते. जवळपास दोन हजार हेक्टर मध्ये बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय उभारण्यात आले आहे.

या प्राणी संग्रहालयात वाघोबा, बिबट, अस्वल, तृणभक्षी प्राणी वास्तव्यास आहेत. या वन्यजीवांना आगीचा फटका बसला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेचे वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे वन अधिकाऱ्यांनी बातमी करण्यास मज्जाव करुन पत्रकारांसोबत अभद्र व्यवहार केला. त्यामुळे काही काळ वनाधिकारी व पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या घटने संदर्भात प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधला असता. आपल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न त्या अधिकाऱ्याने केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना या घटने संदर्भात शहरातील पत्रकार तक्रार करणार आहेत.

जंगलाला आग कश्यामुळे लागली? हा तर शोधाचा विषय आहे. पण शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले. या जंगलात वास्तव्यास असलेल्या वन्यजीवांना आगीचा फटका बसला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशी करावी, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. तसेच वारंवार आग लागू नये यासाठी ठोस उपाययोजना करावी असेही नागरीकांचे म्हणणे आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन, सर्वाधिक र...

    December 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरले आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या 23 राज्...

    आपले राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान...

    मी दिलेले पुरावे खोटे आहेत, हे सांगण्याची एकाचीही हि...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, साखर कारखाने आणि निकटवर्तीयांवर आयक...