1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway      2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरातील एश पॉन्डचे घातक परिणाम

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

नागपूर : सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट याच्या फॉउंडर अँड डायरेक्टर लीना बुधे यांनी कोरडी आणि खापरखेडा येथील एश पॉन्ड विषयी महत्वाची माहिती दिली. कोरडी आणि खापरखेडा येथील खसाडा एश पॉन्ड तुटला. हा एश पॉन्ड कोरडी पॉवर प्लांटचा आहे आणि येथे जवळपास २.४७ करोड टन राखेचा काही वापर होत नसून ती नुसती पडलेली आहे. लीना बुधे यांनी सांगितल्यानुसार हि राख याकरिता पडलेली आहे कारण या राखेचा वापर जसा केला जायला पाहिजे तसा होत नाहीय.

याचा परिणाम असा होतो आहे कि, यात जो ७० टक्के पाण्याचा अंश असतो आणि ३० टक्के राख असून पावसाळा आला कि ती राख ओव्हरफ्लोव होऊन जाते आणि हे पावसाळ्याच्या वेळेस जेव्हा ओव्हरफ्लोव होत तेव्हा ते नदीत मिसळते. कन्हान आणि कोलार या दोन नद्या आहेत. कन्हान नदीमध्ये हि राख सोडल्या जाते. खापरखेडा थर्मल पॉवर प्लांट येथे पण एक एश पॉन्ड आहे ज्याला वारेगाव एश पॉन्ड म्हटल्या जाते. येथे देखील राख ज्या पाइपलाइन खराब आहे तेथून आणि एश पॉन्डच्या लिकेज मधून कोलार नदीमध्ये जाते.

ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सचे दोन इन्टेक वेल्स आहे. एक जो कोलार नदीच्या भागात आहे. तिथे एश पॉन्डचा जो लिकेज होतो तो मोठ्या प्रमाणात इन्टेक वेल्स जवळ जमा होऊन जातो आणि जेव्हा हे जमा होऊन जात तेव्हा जे पंपिंग स्टेशन आहे जे पंप पाणी घेतात त्यानं बंद करावे लागतात. कारण ते फिल्टर्सला ब्लॉक करून टाकतात.
याचाच परिणाम शहरातील पिण्याच्या पाण्यावर होतो. कारण जेव्हा फ्लाय एश जेव्हा पाण्यात मिसळते तर त्या पाण्याला ट्रीट करणे खूप कठीण होऊन जाते. पाण्यातून फ्लाय एश वेगळी करता येत नाही.

Claim Free Bets

या फ्लाय एशचे जेव्हा विश्लेषण केले तेव्हा त्यांना लक्षात आले कि यात अनेक जड धातू आहेत. जसे अल्युमिनियम, आर्सेनिक, बोरॉन, कॉपर आणि सगळ्यात घातक आहे ते मर्क्युरी असे सगळे धातू मानवी शरीराकरिता घातक आहे. यामुळे कॅन्सरसारखे अनेक आजार तसेच इअतरही आजार होऊ शकतात. सर्वे करतअसतांना त्यांना असे लक्षात आले कि, सुरादेवी येथे किडनी स्टोनचे अनेक रुग्ण आहेत. पोटाछनकापूर गावात अनेक महिलांना थायरॉईड आहे. हे फक्त मानवी शरीराकरिता घातक नसून प्राणांकरिता पण घातक आहे. प्राण्यांची हाडं कमकूऊवत होत आहेत, काही प्राणी विकृत जन्माला येत आहेत. याचा परिणाम शेतीवर देखील होत आहे. उन्हाळ्यात जेव्हा हि राख उडते तेव्हा ती पिकांवर जाऊन बसते, यामुळे पिकांवर त्याचा दुष्परिणाम होतो. कापूस देखील खराब होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नीट भाव मिळत नाही. त्यामुळे यावर कारवाई झाली पाहिजे आणि हि समस्या सुटली पाहिजे असे त्यांनी द फ्री मीडियाशी बोलताना सांगितले.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    डावपेचांना समजून घेणे अत्यंत आवश्यक; रणजित मेश्राम

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveधर्म आणि सामाजिक दास्याच्या जोखडाने उध्वस्त झालेल्या माणसाला बाबासाहेबांच्या प्रयत्नाने मिळालेली सुखाची संध...

    भाजपचे नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी चोरट्यांचा डल्ल...

    October 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउपराजधानी असलेल्या नागपुरात चोरट्यांनी भाजप नगरसेवकाच्या घरातील तिजोरी लंपास केली. तिजोरीत 40 ते 50 तोळे सो...

    नागपूर जिल्ह्यातील कोराडीत साकारणार उर्जा शिक्षण पार...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात लोकांना वीज कशी तयार होते याची माहिती देणारा उर्जा पार्क साक...