1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला बच्चू कडूंची ‘दांडी’; अबू आझमीही गैरहजर

Bachchu Kadu-thefreemedia
Spread the love

मुंबई :- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत ६ जागांसाठी ७ उमेदवार मैदानात असल्याने व उमेदवार निवडून येण्यासाठी अतिरिक्त मतं पुरेशी नसतानाही भाजपा आणि शिवसेनेने उमेदवार दिल्याने निवडणूक अटीतटीची झाली आहे.

समर्थक आणि अपक्ष आमदारांना सोबत ठेवण्यासाठी मविआ व भाजपाची संपर्क मोहीम जोरात सुरु आहे. या संपर्क मोहिमेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल ट्रायडंट येथे माविआ समर्थक आमदारांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दांडी मारली. तर अबू आझमीही गैरहजर असल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेनेचे टेंशन वाढले आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या संघटनेचे दोन आमदार आहेत. कडू यांनी हरभरा आणि धानासाठी अनुदानाची मागणी केली आहे. त्यावरून त्यांनी नुकतेच सुचक वक्तव्यही केले होते.

अबू आझमीही गैरहजर

समाजवादी पक्षाने देखील शिवसेनेची काळजी वाढवली आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवले आहे की, पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हेच याबाबत निर्णय घेणार आहेत. या बैठकीला न जाण्याचा निर्णय अबू आझमी यांनी घेतला आहे. आझमी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. पण, आझमी यांनी फोनला उत्तर दिले नाही. भाजप नेत्यांकडूनही आझमी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर बोलताना आझमी म्हणाले की, शिवसेनेने अडीच वर्षात आमच्यासाठी काय केले? आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ….तर मी राजकारणातून सन्यास घेईन; उदय सामंत

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोकणातील सिंधुदुर्गमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्...

    चिपी विमानतळाचा वाद; राणेंनी उगाच फुशारक्या मारू नये...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्री...

    ‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुज...

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सामने ब...