1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार I पण एकीकडे सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा, तर दुसरीकडे चित्रा वाघ यांचा वार

Supriya-Sule-thefreemedia
Spread the love

नागपूर: ३० जुन २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महारष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. उप- मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांना मिळालं होत. पण जवळजवळ एक- सव्वा महिना (४० दिवस) उलटून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. पण आज ९ ऑगस्ट रोजी शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून एकूण १८ मंत्र्यांनी शपथ ग्रहण केली आहे. यात ९ शिंदे गटाचे मंत्री व ९ भाजप चे मंत्री सामील आहेत. सकाळी ११. १५ च्या सुमारास शपथग्रहण विधी सुरु झाला असून राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी १८ मंत्र्यांना राज भवन येथे गोपनीयतेची शपथ दिली.

शपथ ग्रहण केलेले शिवसेनेचे मंत्री : दादा भुसे, शंभूराजे देसाई, संदीपन भुमरे, उदय सामंत, तान्हाजी सावंत, अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड

शपथ ग्रहण केलेले भाजपचे मंत्री : चंद्रकांत पाटील, सुधीर मुंगंटीवार, गिरीश महाजन , सुरेश खाडे, राधाकृष्णविखे पाटील, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, अतुल सवे.

Claim Free Bets

पण आज झालेल्या या मंत्रिमंडळात कोणतीही महिला मंत्री नाही. महिला नेत्याला मंत्रीपद देण्यात आले नसल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात.पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे.राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे,” असे ट्विट करत निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रिपद देणं योग्य नसल्याचे म्हटले आहे. “पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे”, असे ट्विट त्यांनी केले आहे. संजय राठोड हे महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण प्रकरणामुळे त्यांना राजीनामा दयावा लागला होता.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1556887805321936897

येणाऱ्या काळात उरलेले मंत्री शपथ घेतील असे मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यात पहिली त चौथी शाळा दिवाळीनंतर सुरु?

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमात्र विद्यार्थ्याच्या लसीकरणाचे नियोजन काय? राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने, राज्य सरकारने आता...

    ‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’

    March 4th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveगेल्या अनेक महिन्यांपासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. यासाठी क...

    भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जम...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांन आजा पुन्हा एक पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केला आहे. मलिकांच्य...