1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway      2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नव्या मंत्र्यांच्या यादीवरून वाद सुरूच, आता तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा

Chief Minister Shinde-thefreemedia
Spread the love

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अत्यंत कठीण असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 27 दिवस उलटले तरी त्यांना मंत्र्यांची यादी अंतिम करता आलेली नाही. मंत्र्यांच्या नावांबाबत भाजप आणि शिंदे गटात एकमत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

त्यासाठीच शिंदे वारंवार दिल्लीत धाव घेत आहेत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी विचारमंथन करत आहेत. आता त्यांनी तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मात्र अजूनही नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघं राज्य आणि सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. शिंदे सरकारच्या विस्ताराला अखेर शुक्रवारी म्हणजे 29 जुलैचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज रात्री ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळाची यादी निश्चित होऊन शुक्रवारी विस्तार केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Claim Free Bets

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. आता ही दिल्लीवारी झाल्यानंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राम रहीम सिंग यास CBI कोर्ट आज सुनावणार शिक्षा

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबहुचर्चित डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणखी एका गु...

    फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही; सर्वोच्च न्...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही. परंतु, त्यांचा गैरवापर रोखण्याकरिता यंत्रणा अधिक मजबूत कराव...

    कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एवढ्या लोकांन...

    December 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्र सरकारतर्फे नित्यानंद राय यांनी दिली माहिती कलम ३७० जम्मू काश्मीरमधून हटवल्यानंतर जमीन खरेदीचे नियम श...