1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नव्या मंत्र्यांच्या यादीवरून वाद सुरूच, आता तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा

Chief Minister Shinde-thefreemedia
Spread the love

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अत्यंत कठीण असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 27 दिवस उलटले तरी त्यांना मंत्र्यांची यादी अंतिम करता आलेली नाही. मंत्र्यांच्या नावांबाबत भाजप आणि शिंदे गटात एकमत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

त्यासाठीच शिंदे वारंवार दिल्लीत धाव घेत आहेत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी विचारमंथन करत आहेत. आता त्यांनी तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मात्र अजूनही नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघं राज्य आणि सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. शिंदे सरकारच्या विस्ताराला अखेर शुक्रवारी म्हणजे 29 जुलैचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज रात्री ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळाची यादी निश्चित होऊन शुक्रवारी विस्तार केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. आता ही दिल्लीवारी झाल्यानंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Claim Free Bets
    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ५ वर्षांनंतर भारतातून पेट्रोल नाहीसे होईल, असा दावा ...

    July 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशात इंधनाच्या किंमती वाढत असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुर...

    बुली बाई अँप वरून आता हिंदू महिलांवर हल्ला

    January 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveबुली बाई अँप प्रकरणात मुस्लिम महिलांना टार्गेट केले गेले. आता याच प्रकरणी हिंदू समुदायातील महिलांविषयी आक्ष...

    उत्तराखंडमध्ये अंदाधुंद पावसामुळे पूरस्थिती, ४६ जणां...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या अंदाधुंद, मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली...