1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ठाकरे सरकार अजून किती मुडदे पाडणार आहे: राजू शेट्टीचा सवाल

raju shetty
Spread the love

बीड जिल्ह्यातील गेवराई या गावातील नामदेव जाधव या ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साखर कारखान्याला ऊस गाळपाला जात नसल्याच्या नैराश्येमुळे त्यांने हे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार आहेत. राज्यसरकार आणखी किती मुडदे पाडणार आहे आणि किती मुडद्यांवर राज्य करणार आहे, असा खोचक सवालही शेट्टी यांनी केला आहे.

यावेळी शेट्टी म्हणाले, नामदेव जाधव या गेवराई येथील शेतकऱ्याने नैराश्येच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोन एकर उस असणाऱ्या नामदेव जाधवने साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्याकडे, मुकादमाकडे आणि उसतोडणी मशीन मालकाकडे अनेक ऊस गाळप करण्यासाठी अनेक हेलपाटे घातले.

पैशाची मागणी करुन उसतोड करण्यास नकार दिल्याने त्याने नैराश्येच्या भरात आत्महत्या केली आहे. त्यामुळे याला कारणीभूत असणारे मुकादम, अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. खरंतर एक वर्षापूर्वी मराठवाड्यात अतिरिक्त ऊस पिकणार हे सरकारला माहित होते. ज्या पद्धतीने टंचाईच्या काळात जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या विहीरी अधिगृहीत करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देतात.

Claim Free Bets

अशाच पद्धतीने बंद साखर कारखाने ताब्यात घेऊन सक्षम यंत्रणेकडे एक वर्षासाठी चालावायला देता येऊ शकते. उपाययोजना करुन जाधव यांचा ऊस गाळपास देता आला असता, परंतु हे करायला सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे अशा निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याला सर्वस्वी असून राज्यकर्ते जबाबदार असून तुम्ही अजून किती मुडदे पाडणार आहेत हे सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशभरात उद्यापासून कॉंग्रेसचे ‘जेलभरो’; ...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना त्यांना...

    भाजप उमेदवाराचा प्रचार; आशिष देशमुखांची काँग्रेसमधून...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयेत्या ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी आमदार आशिष देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेश...

    बंडखोर व गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद &#...

    July 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यास...