1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांचा संदेश

Spread the love

वीज ग्राहक संघटनेच्या बातमीचा इम्पॅक्ट प्रताप होगाडे

नागपूर: सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. आता ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ही रक्कम भरण्यासाठी विनियमामध्ये सहा हप्त्यांची तरतूद केली आहे. तथापि महावितरणने स्वतःच्या सोयीसाठी ही सवलत डावलून हप्ते न देता ग्राहकांनी एकरकमी संपूर्ण रक्कम भरावी अशी मागणी बिले लागू केली होती. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने विनियमातील तरतूद जाहीर करताच एका दिवसात कंपनीने ग्राहकांना सहा हप्त्यांत रक्कम भरता येईल असे एसएमएस SMS पाठविण्यास सुरुवात केली आहे. पण कंपनीने नियमबाहय वागण्याची व ग्राहकांना अडचणीत आणण्याची आपली प्रथा आता कायमची बंद करावी” असा इशारा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी आज दि २७ एप्रिल रोजी आयोजित पत्र परिषदेत दिला. यावेळी डॉ. विलास सुरकर, रमेश शर्मा, मुकद माळी आणि विजय खोब्रागडे उपस्थित होते उपस्थित होते.

राज्यातील सर्व गरजू ग्राहकांनी या सहा हप्त्यांच्या तरतुदीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रताप होगाडे यांनी याप्रसंगी ग्राहकांना केले आहे. वास्तविक महावितरण कंपनीने सुरक्षा ठेव मागणी बिलामध्ये विनियम क्र. १३.४ प्रमाणे सुरक्षा ठेवीच्या एकूण सहा हप्त्यांपैकी पहिला हप्ता रकमेची मागणी करायला हवी होती व ग्राहकांना सहा अथवा कमी हप्त्यांत रक्कम भरण्याची विनियमानुसार आयोगाने दिलेली स्पष्टपणे कळवायला हवी होती. तथापि केवळ कंपनीच्या आर्थिक गरजा ध्यानी घेऊन व ग्राहकांच्या सद्यस्थितीतील दोन वर्षांच्या कोरोना नंतरच्या आर्थिक अडचणी ध्यानी न घेता कंपनीने ग्राहकांना ही माहिती देण्याचे जाणीवपूर्वक टाळले होते हे स्पष्ट आहे, अशीही टीका प्रताप होगाडे यांनी केली आहे.

दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यासाठी आयोगाने वितरण परवाना धारकांना अधिकार दिले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यावर, महावितरण कंपनी ग्राहकांचा मागील एका वर्षातील सरासरी वीज वापर व सध्याचे नवीन दर या आधारे नवीन सुरक्षा अनामत रक्कम निश्चित करते व जमा सुरक्षा ठेव कमी असेल, त्या ग्राहकांना कमी असणारी फरकाची रक्कम भरण्यासाठी वेगळे बिल देते. ग्राहकांचा सरासरी वापर कमी असेल अथवा कमी झाला असेल, तर आधी जमा असलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम कमी करून जादा जमा रक्कम ग्राहकांना बिलाद्वारे परत देण्यात यावी अशी तरतूद विनियम क्र. १३.५ मध्ये आहे. तथापि कंपनी स्वतःहून याची अंमलबजावणी कधीही करत नाही. त्यामुळे अशा संबंधित ग्राहकांनी परतावा मागणीचा अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर पुढील बिलामध्ये समायोजित करून जादा जमा रक्कम परत करण्यात येईल, अशीही तरतूद या विनियम क्र. १३.५ मध्ये आहे. त्याप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेचा परतावा मिळावा अशी मागणी संबंधित ग्राहकांनी करावी असेही आवाहन प्रताप होगाडे यांनी केले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपुरात आंतरराष्ट्रीय महिला दिनी विविध कार्यक्रमांच...

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीन...

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘जनाब संघ’ म्...

    March 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेना नेते खा. संजय राऊत यांचा संतप्त सवाल नागपूर: विदर्भ व मराठवाड्यातील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला...

    NEET SS Exam 2021: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जुन्या ...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveNEET SS Exam देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. कारण यावर्षी जुन्या पॅटर्ननुसार...