1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘एमआयएम’चा प्रस्ताव म्हणजे भाजपने सेनेविरोधात सोडलेलं ‘पिल्लू’

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर: संपूर्ण राज्यात रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच ‘एमआयएम’ पक्षावरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये शनिवारी चांगलीच धुळवड रंगली. ‘एमआयएम’ने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात राजकीय बोंबाबोंब सुरु झाली.

‘भाजपला हरवायचेच आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एमआयएम’ सोबत युती करावी’, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. त्याचवेळी, ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांबरोबर उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही’, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

या राज्यातील बोंबाबोंबीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन सेनेचे खासदार पक्षातील नेते व कार्यकर्ते यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा आज दि २० मार्च दुपारी १२.०० वा आयोजित केली. यात जोरदार मार्दर्शन करत जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयएमसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना ही प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे. तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे.

एम आय एम चा प्रस्ताव म्हणजे भाजपाने सेनेविरोधात कट कारस्थान करण्यासाठी सोडलेलं हे ‘पिल्लू’ असून त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावलेला असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आपल्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याला बळी पडू नका. राज्यातील जनतेत जो संभ्रम निर्माण होत आहे, तो दूर करा, असं उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि जिल्हा प्रमुखांना सांगितलं.

Claim Free Bets

शिवसंपर्क अभियान

महाराष्ट्रात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनते पर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं “शिव संपर्क अभियान” सुरू केलंय. या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात सुरू होणार आहे. या 19 जिल्ह्यात शिवसेनेचे 19 खासदार शिव संपर्क अभियान सुरू करणार आहेत. पहिल्या टप्यातील 19 जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्या सोबत शिवसेना पदाधिका-याची 12 जणांची टीम कार्यरत असणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    प्रजासत्ताक दिनी पत्रकारांचे वार्षिक संमेलन व पुरस्क...

    January 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: टिळक पत्रकार भवन ट्रस्ट (TPBT), नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट (NUWJ) आणि पत्रकार क्लब ऑफ नागप...

    नागपूर जि.प.ने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय थांबवाव...

    July 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: जिल्हा परिषद शिक्षण समिती नागपूर यांनी नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्...

    अलौकिक समाधान देणारी मॅरेथॉन श

    March 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: व्यायाम प्रकारातील धावणे या प्रकाराचा एक शारिरीक क्षमता विकास टप्पा म्हणून मॅरेथॉन पूर्ण करण्याचे स...