मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथे अटक केली होती. राणे यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. पण याप्रकरणी नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांचा जमीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी राणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंची ऐकून राणेंना जामीन मजूर केला. जमिनिवर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पाहिलं ट्विट केलं.
केवळ दोन शब्दात ‘सत्यमेव जयते’ असं ट्विटत्यांनी केला. तसेच त्यांच्या मुलगा नितीश राणे यांनी देखील मनोज वाजपेयी च्या सॅनेमातील डायलॉग ट्विट केला आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याप्रकरणी वातावरण काल चांगलेच तापले होते.
संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. तर राज्यभरातील विविध ठिकाणी आक्रमक झालेले शिवसैनिक नारायण रामेंच्या विरोधात निदर्शने करताना दिसत होते.