1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

….तर मी राजकारणातून सन्यास घेईन; उदय सामंत

uday samant
Spread the love

कोकणातील सिंधुदुर्गमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमाव बंदी लागू केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राणेंच्या यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. तसेच राणे यांच्या यात्रेमुळे मी जमाव बंदीचे आदेश दिले हे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपकडून देशभर जनाशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा उद्यापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री उदय सामंत देखील आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की,’कोणाचा तरी दौरा आहे म्हणून आहे म्हणून मी रत्नागिरी दौऱ्यावर आहे, असे काही नाही, तो केवळ योगायोग समजावा. मागील तीन दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या वेळापत्रकाला अनुसरून आम्ही दौरे लावले नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचा आरोपाविषयी सामंत म्हणाले की, ‘भाजपाने खोटे आरोप केले आहेत. याचे पुरावे सिद्ध झाल्यास मी राजकीय सन्यास घेईल. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यामुळे त्यांना वाटले असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा आज निकाल

    July 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे झारखंडच्य...

    “किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार…....

    November 17th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveत्रिपुरातील घटनेमुळे महाराष्ट्रातही हिंसाचाराचे दृश्य पहिला मिळाले. अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचा...

    ‘ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची’ अशी सर...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत...