1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही; एकनाथ शिंदे

Eknath Shinde-thefreemedia
Spread the love

विरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्र्याचा टोला

नाशिक : मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने वारंवार दिल्लीवारी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अजितदादा गडचिरोली दौऱ्यावर थोडे उशिरा पोहोचले. देवेंद्र फडणवीसांसोबत मी गडचिरोलीच्या टोकाला गेलो होतो. पूर ओसरल्यानंतर अजितदादा गेले आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथे जेव्हा पूर परिस्थिती होती, तेव्हा फिरत होते. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. यंत्रणा लोकांच्या मदतीला आहे. युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे करण्याचा आदेश दिलेले आहेत,”

दरम्यान, अजित पवार यांनी नुकतीच गडचिरोली येथे पुरग्रस्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे प्रत्युत्तर दिले.

Claim Free Bets

काल अजित पवार म्हणाले होते की मुख्यमंत्री शिंदे म्हणतात सरसकट पंचनामे करायला सांगितले पण शेतकरी म्हणतात पंचनामे झाले नाहीत. दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यावर उपाययोजना व्हायला हव्या. अन्य मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा.

“शेतकऱ्याना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्याचे आहे. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दोन ते तीन दिवसात सर्व शंभर टक्के पंचनामे होतील, आणि त्यांना योग्य ती मदत सरकारच्या वतीने दिली जाईल. स्वतः मी आणि उपमुख्यमंत्री यात लक्ष घालत आहोत,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली असून यंदाचा मेळावा हा सायनच्या (शीव) षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आह...

    भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकी...

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजीनामा देऊन नाराजी कळवली-डॉ शिरीष गोडे गांधीजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात भाजपला मोठा ...

    जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा; गृहम...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आ...