1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली

Prithviraj Chavan
Spread the love

पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

केंद्र सरकारची अवस्था केविलवाणी असून त्यांनी भारतातील जनतेची अवस्थाही केविलवाणी करुन टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली. ही एकप्रकारे जनतेची लूट असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी सातारा येथे हॉटेल प्राईडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारी, इंधन दरवाढ, लॉकडाऊन, महागाई त्याचबरोबर अन्य विषयांवर पत्रकारांसमोर विवेचन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कारभारावर सडकून टीका करत असतानाच मोदींच्या ‘लसोत्सवा’वरही जोरदार निशाणा साधला.

भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याचा दावा मोदींनी केला असलातरी जगात आपला क्रमांक 144 वा आहे. याचाच अर्थ भारताच्यापुढे अजून 143 राष्ट्र आहेत. ही बाब सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला हवी, अशी कोपरखळीही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी मारली.

ते म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर लोक नाराज असून त्यांच्या विरोधात लोक बोलत आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांनी पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढ करुन लोकांच्या गोरगरिबांच्या खिशातून 23 लाख कोटी गोळा केले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाला आल्यानंतर मोदी सरकार पॅनिक झाले. यानंतर इंधन दरवाढ थोडी कमी केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    योगींना भेट मिळाला चांदीचा बुलडोझर

    March 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत सातत्याने बुलडोझर विशेष चर्चेत राहिल्याचे दिसले. विरोधी पक्षाने सतत त्यावरून...

    भारताला पुढील सहा महिन्यात करावा लागू शकतो वीजटंचाईच...

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेश अंधारात जाण्याची शक्यता वाहतूक इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र...

    कोरोनाचे संक्रमण कमी झाले की, यात्रा, जत्रांना परवान...

    August 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आ...