1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यात ठाकरे सरकार कधीही पडू शकतं?

CM Uddhav Thackeray
Spread the love

देशात काल लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्येै सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलीय. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार येणार हे निश्चित झालेलं असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. निकालाच्या भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी युपी तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया दिलीय. तर राज्यातील सरकार अस्थिर होईल का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं असं ठामपणे म्हटलंय.

कोणत्या कार्यक्रमात बोलले केतकर?

पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर गुरुवारी सायंकाळी एका वृत्त वाहिनीशी बोलताना कुमार केतकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. कुमार केतकर आणि भाजपाचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाग घेतलेल्या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर या निवडणुकीच्या निकालांचा काय परिणाम होईल यासंदर्भात चर्चा झाली त्यावेळीच केतकर यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वत्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना प...

    January 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे कडक निर्बंध तसेच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना ...

    आर्यन खानचा ऑर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveहायकोर्टातही लगेच दिलासा नाही ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB च्या अटकेत असलेल्या आर्यन खानच्या अडचणी काही केल्य...

    तक्रारदार गायब, पण खटला सुरूच!

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंहावर निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्याया...