1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यसभेच्या निवडणूकीवरून आघाडी सरकार बैकफूटवर

Rajsabha-thefreemedia
Spread the love

मुंबई: महाराष्ट्रात दिनांक १० जून रोजी झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपा यांच्यात रंगतदार लढत साऱ्या राज्याने बघितली. या राज्यसभेच्या निवडणुकीत सेना आणि भाजपाने सहाव्या जागेसाठी आपला चौथा उमेदवार उभा केला होता. त्यामुळे या सहाव्या जागेसाठी सेना-भाजप मध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यानुसार अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्ता बसविण्यासाठी आघाडीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांनी ‘गद्दारी’ केल्यामुळे सेनेचा ‘दुसरा संजय’ राज्यसभेच्या निवडणूक रणांगणात धारातीर्थ पडला. त्यामुळे हा पराभव शिवसेनेचा चांगलाच जिव्हारी लागला असून, महाविकास आघाडी या निवडणुकीमुळे बैकफूटवर आली आहे.

छोट्या पक्षांनी व अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना आता निधी द्यायचा नाही असे सूतोवाच सेने पाठोपाठ काँग्रेसनेही काल केले होते. त्याच धर्तीवर राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. तत्पूर्वी, राज्याची सूत्रे सेनेचे हातात देतानी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला धोबीपछाड करत राज्याची सत्ता हस्तगत केली होती. आता राज्यसभा निवडणुकीनंतर ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ यानुसार आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. दि २०जूनला होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीतील या तिन्ही पक्षांनी आपआपले बघावे असा निर्वाणीचा निरोप सेनेने सोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेला हवी तशी मदत केली नाही, असा आरोप सेनेच्या काही नेत्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करून शिवसेनेच्या दुसऱ्या ‘संजय’ ला पराजयाचे तोंड पाहायला भाग पाडण्यात हातभार लावला असेही वक्तव्य काही सेना नेत्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायला तसूभरही तयार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे विधान परिषदेत काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मारबत मिरवणुकीतील गर्दी कोरोना नेणार की त्याला आमंत्...

    September 7th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveबैल-पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणुकी नागपूर शहरातून काढली जाते. य...

    पंडित नेहरूंना ED ची नोटीस बजावल्यानंतरच काहींचा आत्...

    June 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसंजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून केंद्र सरकारवर हल्लाबोल मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्यावतीने काँग्रेसच्या...

    राज्याततील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 ...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. ...