1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जलआक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Spread the love

मराठवाड्यातील पाणीप्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष

जालना: राज्यात सर्वत्र पाणीप्रश्न पेटला असून ते सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकारविरोधात मैदानात उतरली आहे. बुधवार,१५ जून रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जालन्यात दाखल झाले आहेत. जालन्यात पाणी प्रश्न तीव्र झाला असून, या समस्येवर वाचा फोडण्यासाठी भाजपा जालन्यात दाखल झाली आहे.

मागील दोन वर्षांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पाण्याच्या समस्या सुरु आहेत. जालन्यातील मामा चौकातून भाजपाचा जल आक्रोश मोर्चा निघाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरु आहे. त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. ढोल ताश्यांच्या गजरातून मामा चौकातून मोर्चा निघाला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने पाणी समस्या सोडवता यावी म्हणून १२९ कोटींची तरतूद केली होती. मात्र अजूनही ठाकरे सरकराने मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवलेला नाही. ठाकरे सरकार जनतेचा पाणी प्रश्न गंभीर घेत नाही आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

Claim Free Bets

याआधी भाजपाने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चालाही जनतेने खूप गर्दी केली होती. या मोर्चात जास्त महिलांचा समावेश होता. त्यावेळी १ हजार ६८० कोटी रुपयांचा प्लॅन दिला आहे, तरीही ठाकरे सरकारने जनतेचा प्रश्न सोडवलेला नसल्याचे फडणवीस म्हणाले होते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिंदेगटात सामील होण्यासाठी वैदर्भीय नेत्यांना भाजपाच...

    June 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: भाजपाने सत्ता हस्तगत करून राज्याची सरकार चालविण्यासाठी अजून एक षडयंत्र रचल्याचे समोर आले असून वैदर्...

    राज्यात ठाकरे सरकार कधीही पडू शकतं?

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात काल लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आ...

    22 ऑक्टोबरपासून उघडणार राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकारने जारी केली नियमावली महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने याआधी 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमा हॉल आण...