1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पहिल्यांदाच चार मालवाहू जहाजांव्दारे अन्नधान्य, ‘टीएमटी बार’ची वाहतूक

Spread the love

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज गुवाहाटी येथे पाटणा ते पांडू अशी बांगलादेशमार्गे अन्नधान्याची वाहतूक करणा-या पहिल्या मालवाहू जहाजाचे स्वागत केले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वसर्मा, आणि गुवाहाटीच्या लोकसभेतील खासदार क्विन ओझा यांच्यासह अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय बंदोपाध्याय उपस्थित होते.

या सर्व मान्यवरांनी एमव्ही लाल बहादूर शास्त्री या स्व-चलित जहाजाचे स्वागत केले. या मालवाहू जहाजातून भारतीय अन्न महामंडळासाठी 200 मेट्रिक टन अन्नधान्याची बांगलादेशमार्गे पाटणा ते पांडू पहिल्यांदाच वाहतूक करण्यात आली. आसाम आणि ईशान्य भारतासाठी अंतर्देशीय जलवाहतुकीचे नवीन युग सुरू झाल्याची घोषणा यावेळी अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडून (आयडब्ल्यूएआयकडून) करण्यात आली. त्यानुसार एनडब्ल्यू1 आणि एनडब्ल्यू 2 यांच्या दरम्यान एक वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार जलमार्गाने मालवाहतूक करण्याची आयडब्ल्यूएआयची योजना आहे.

बांगलादेशमार्गे ऐतिहासिक व्यापारी मार्गाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना पीएमगतीशक्ती अंतर्गत वेग आला आहे. यामुळे आता ईशान्येकडील राज्यांच्यादृष्टीने एक संपर्क केंद्र म्हणून हा भाग विकसित होवू शकणार आहे. एकात्मिक विकास आराखडा, पीएम गती शक्ती अंतर्गत ब्रह्मपुत्रा नदीमधून मालवाहतूक वेगाने व्हावी, यासाठी कार्य करण्यात आले आहे.

यामध्ये आणखी एक मालवाहू जहाज एमव्ही राम प्रसाद बिसमिल तसेच कल्पना चावला आणि एपीजे अब्दुल कलाम या सर्वसुविधायुक्त दोन्ही नौकांनी दि. 17 फेब्रुवारी, 2022 रोजी हल्दिया येथून प्रवासाला प्रारंभ केला आहे. त्यामधून 1800 मेट्रिक टन टाटा स्टील वाहून आणण्यात येत असून ही मालवाहू जहाजे पांडू येथे पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. ही मालवाहू जहाजे बांगलादेशाच्या सीमेवर धुब्री येथे याआधीच पोहोचली आहेत. तसेच नुमालीगड बायो-रिफायनरीचा ओडीसी (ओव्हर डायमेंशनल कार्गो, 252 मेट्रिक टन) दि. 15 फेब्रुवारी रोजी हल्दिया येथून आयडब्ल्यूटी मार्गे आयबीपी मार्गे सिलघाट येथे पोहोचला आहे. तसेच आणखी एक ओडीसी- 250 मेट्रिक टन माल घेवून येणारे जहाज सिलघाटच्या मार्गावर आहे. आयडब्ल्यूएआयच्यावतीने या मार्गांवर निश्चित वेळापत्रक तयार करून नियमित मालवाहू सेवा चालू ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे ७ लष्करी जवानांचा मृत्यू

    February 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकामेंग (अरुणाचल प्रदेश): अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरच्या उच्च उंचीच्या भागात हिमस्खलनात अडकलेल्या सात ...

    मायावतींचा पक्ष “मोठी शक्ती म्हणून उदयास येईल&...

    March 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) राष्ट्रीय प्रवक्ते सुधींद्र भदोरिया यांनी मंगळवारी उत्तर प्रदेश विधानसभ...

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

    January 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३...