1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार; वडेट्टीवार

uddhavthackery-cm-thefreemedia
Spread the love

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या संदर्भात प्रयत्न केले आहेत. वित्त आयोगाकडून आज आमच्या मदत व पुनर्वसन खात्याकडे निधी वर्ग केला जाईल. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थिती हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात गेला पाहिजे. हा निधी रब्बी हंगामाच्या उपयोगी पडावा, खरिप तर गेला आहे. रब्बी हंगामाच्या कामासाठी हा निधी वापरला जावा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

मदतीची सुरुवात मराठवाड्यातून

55 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती सर्वेक्षणातून आली आहे. सर्वाधिक 70 टक्के नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं आणि सर्वाधिक गरज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 3700 कोटी रुपयांचा निधी वाटला जाईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

केंद्र सरकारची मदत येईल अशी आशा
एनडीआरएफच्या निकषाप्रमाणं केंद्र सरकारकडून अद्याप निधी आलेला नाही. मात्र, तो निधी येईल, अशी अपेक्षा असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Claim Free Bets

विदर्भातील शेतकऱ्यांन मदत कधी?

अकोला, अमरावती आणि वाशिम भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी दिला जाईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव सार्थ; राज्यपाल कोश...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसिंधु नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक व अध्यात्मिक परिमाण आह...

    “महाराष्ट्र मिटाओ विदर्भ मिलाओ” १ मे रोज...

    April 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविधान भवन हे नाव मिटवून त्याठिकाणी विदर्भ भवन असे लिहणार -प्रकाश पोहरे नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्य...

    मुंबईतील साठ मजली टॉवरला लागली भीषण आग

    October 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमुंबईतील लोवर परेल परिसरातील बहुमजली टॉवर अविघ्न पार्क येथे दुपारी १२वाजता दरम्यान अत्यंत भीषण आग लागली. अव...