1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित,पर्यावरणावर परिणाम

Spread the love

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील कोराडी आणि खापरखेडा थर्मल पॉवरमुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. या प्रकल्पांमुळं हवा, पाणी आणि माती प्रदूषित होत असल्याचा धक्कादायक अहवाल बाहेर आला आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मंथन अध्ययन केंद्र आणि असर संस्थेनं याबद्दल सर्वे केला होता.

महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) कोराडी (२४०० मेगावॅट) आणि खापरखेडा (१३४० मेगावॅट) प्रकल्पांच्या भोवतालच्या प्रदेशात प्रदूषण होत आहे. भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल हे मर्क्युरी, आर्सेनिक, ॲल्युमिनिअम, लिथिअम इत्यादीसारख्या विषारी धातूंनी दूषित झाले. फ्लाय ॲशमुळे व्यापक स्तरावर हवा, पाणी आणि माती दूषित झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.

पोल्युटेड पॉवर : हाऊ कोराडी ॲण्ड खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन्स आर इम्पॅक्टिंग द एन्व्हायरन्मेन्ट, या शीर्षकाखाली हा अभ्यास करण्यात आला. दोन्ही विद्युत निर्मिती केंद्रे आणि ॲश पॉण्डमधून होणारा प्रदूषक घटकांचा विसर्ग तातडी थांबविणे गरजेचे आहे. स्थानिक प्रतिनिधी, नागरी संस्था सदस्य आणि स्वतंत्र तज्ज्ञांच्या समितीच्या निरीक्षणाखाली प्रदूषणामुळे झालेले दुष्परिणाम दूर करावे, असे हा अभ्यास सुचवतो.

यंत्रणा समस्या सोडविण्यात अपयशी

दोन्ही विद्युत निर्मिती प्रकल्प आणि ॲश पॉण्डसारख्या प्रकल्पाशी संबंधित पायाभूत रचनांमुळे या भागात दीर्घ काळापासून प्रदूषणाच्या नोंदी आहेत. अधिकृत यंत्रणा या समस्या सोडवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरली असल्यानं हा अभ्यास करण्यात आल्याचे सीएफएसडीच्या संचालक लीना बुद्धे म्हणाल्या.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने कोराडी प्रकल्पास दोन नवीन युनिटसह (प्रत्येकी ६६० मेगावॅट) विस्तारीकरणासाठी पर्यावरणीय आकलन करण्यासाठी असलेले मुद्दे दिले आहेत, अशी माहिती लीना बुद्धे यांनी दिली. यामुळे प्रदूषण आणखी वाढणार असून ही चिंतेची बाब आहे, असे बुद्धे यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यात केव्हाही निवडणुका लागण्याची शक्यता; भाजपचा स...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या घडीला महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरका...

    ….… हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे

    November 12th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the love‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मि...

    दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचा आरोप क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी विरु...