1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ऐतिहासिक नोटबंदी नंतर अशी लावली गेली जुन्या नोटांची विल्हेवाट

thumbnail-thefreemedia
Spread the love

भारतात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री साडेआठ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली आणि केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याची प्रतिक्रिया उमटली. या ऐतिहासिक निर्णयामुळे १५.४१ लाख कोटी मूल्याच्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा एका क्षणात कागदी तुकडे बनून गेल्या. त्यावेळी एकूण चलनात या मूल्याच्या नोटांचा वाटा ८६ टक्के इतका होता. इतक्या प्रचंड संखेने बेकार झालेल्या या नोटांचे पुढे काय झाले याचा प्रश्न अनेकांना पडला होता.

या बेकार ठरलेल्या चलनी नोटा हजारो टन वजनाच्या होत्या. त्यातील बराच मोठा हिस्सा द.आफ्रिकेत पाठविला गेला. आणि या नोटातील ८०० टन वजनाच्या नोटा केरळच्या उत्तर मलबार भागातील एका प्लाय बोर्ड बनविणाऱ्या कंपनीत प्रोसेस करण्यासाठी पाठविल्या गेल्या. या नोटांचे बारीक तुकडे करून त्यापासून हार्ड बोर्ड बनविले गेले. या हार्डबोर्डचा वापर म. गांधी यांच्या क्षतीग्रस्त स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी केला गेला.

रिझर्व्ह बँकेने चलनाबाहेर केलेल्या या नोटांचे तुकडे करण्यासाठी देशभरात २७ श्रेडींग सेंटर सुरु केली होती त्यातील एका मलबार मध्ये होते. वेस्टर्न इंडिया प्लायवूड लिमिटेड कडे नोटबंदी जाहीर होण्यापूर्वी महिनाभर चलनातील जुन्या जीर्ण नोटा पाठविल्या गेल्या होत्या. या कंपनीत ८०० टन वजनाच्या आणि चलनाबाहेर काढल्या गेलेल्या ५०० व १ हजार रुपयांच्या नोटांपासून हार्ड बोर्ड बनविण्याचे काम वर्षभर सुरु होते. अर्थात ही कंपनी नोटबंदी पूर्वीपासूनच रिझर्व बँकेबरोबर काम करत होती. नोटांपासून हार्ड बोर्ड बनविण्याचा निर्णय नंतर घेतला गेला होता. त्यासाठी कंपनीने रीतसर निविदा भरली होती.

Claim Free Bets

चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कागद उच्च गुणवत्तेचा असतो. त्यामुळे प्रथम रीसायकलिंग करून त्यापासून ब्रिक्स बनविल्या जातात मग हे ब्रीकेवेट रिझर्व बँकेला परत पाठविले जातात आणि मग त्यापासून प्लाय बनविले जाते असे समजते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काश्मिरी पंडित समुदायाचे काश्मीरमध्ये पुनर्वसन

    July 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: जम्मू-काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या विकास पॅकेजअंतर्गत काम करणा...

    15 वर्षांखालील मुलांना लस देण्याची भारताची योजना नाही

    December 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतात, 3 जानेवारीपासून, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी लस देण्यास सुरुव...

    कोरोना काळात जे चीन करू शकला नाही ते भारताने करून दा...

    May 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय QUAD शिखर पर...