1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Maharashtra School I राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार :शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Maharashtra School-thefreemedia
Spread the love

नागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील शाळा 15 जून (Maharashtra School) रोजी सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही.

त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात सांगितलं की, बारावीचा निकाल लवकरच लागेल.

महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट आणि स्वजीवी प्रोग्राम
वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, एक क्रांतिकारी पाऊल शालेय शिक्षण विभाग टाकत आहे. महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्वजीवी प्रोग्राम या कार्यक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. एचसीएलकडून 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना यांच्याकडून प्रशिक्षण देणार आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइनही ट्रेनिंग दिली जाणार आहे. विज्ञान शाखेत गणित विषय घेऊन 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी या कार्यक्रमात प्रवेश घेऊ शकणार आहेत. फक्त प्रशिक्षणच नाही तर नोकरीशी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगड ही कंपनी घालून देणार आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, स्वजीवी उपक्रम सुद्धा आम्ही सगळ्या सरकारी शाळांमध्ये सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या बाबतीत शिक्षण मिळणारा हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. काही देशांशी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात करार करणार आहोत. आपल्या विद्यार्थ्यांना तिथे जाऊन शिकता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेतच आपल्या आवडीचं शिक्षण मिळावे, यासाठी हे काम आम्ही करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोदीविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच शरद पवार

    April 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसंजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य देशात मोदींविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार होय. ...

    डॉ उज्वला चक्रदेव यांची नाथ‍िबाई दामोदर ठाकरस...

    September 11th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveनागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ उज्वला श‍िरीष चक्रदेव यांची श्र...

    ‘राणी लक्ष्मीबाई’ योजनेंतर्गत ‘हे&...

    June 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: देशभरासहित राज्यातही केंद्र आणि राज्य सरकारद्वारे विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना प्रोत्साहन दे...