1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जिल्हा परिषदेची शासनाकडे ४७५ कोटींची थकबाकी

zilla parishad
Spread the love

जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध विकासकामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्कांचे तब्बल ४७५ कोटी रुपयांची थकबाकी त्वरित द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा निधी उपलब्ध झाल्यास कोरोनामुळे रखडलेली अनेक विकासकामे मार्गी लावता येतील, असे देखील पानसरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नापैकी मुद्रांक शुल्काचा निधी हा मुख्य स्रोत आहे. परंतु गेल्या सात-आठ वर्षांपासून अपुरा मिळत आहे. गेल्या पाच वर्षांचा तसेच यंदाचा निधी असा जवळपास ४७५ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनाकडे थकीत आहे. पुणे जिल्ह्याचा विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता ग्रामीण भागात विकासकामांसाठी निधी कमी पडतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनामुळे विकास निधीला मोठा कट लागला आहे. याचा परिणाम विकासकामांवर झाला असून, अनेक महत्त्वाची कामे निधीअभावी रखडली आहेत.

जिल्ह्यातील विविध खरेदी विक्रीच्या स्टँप ड्यूटीतून जिल्हा परिषदेला शासनाकडून मुद्रांक शुल्क निधी मिळत असतो. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमन १९६१ च्या कलम १५८अन्वये हा निधी दिला जातो. जिल्हा परिषदेचा उत्पन्नाचा हाच मुख्य स्रोत असतो. या निधीवरच जिल्ह्याचा विकास अवलंबून असतो. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अपुरा निधी मिळत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चेन्नईत ‘जल प्रलय’, 14 जणांचा मृत्यू;

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकार अपयशी, सरकारविरोधात लोकांचा संताप तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. ड...

    ‘मग महाराष्ट्र सरकारने मुंबई – पुणे द्रु...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूपीए सरकारने ७० वर्षांच्या काळात उभ्या केलेल्या सर्व गोष्टी भाजप...

    सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे आदेश

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकारच्या सर्व याचिका जानेवारीपासून ‘ई-फायलिंग’द्वारेच उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्य...