1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होवू नये म्हणून राजीनामा दिला’; संजय राठोड

sanjay rathod
Spread the love

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं आहे.

‘मी एका प्रकरणा दरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे. मात्र, मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असं राठोड म्हणाले. सोलापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये संजय राठोड बोलत होते.

‘मी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. जेव्हा आरोप झाले अधिवेशन चालू देणार नाही असे म्हटले गेले. मी त्या पक्षात आहे. नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ काम करणारे म्हणून आहे. मन लावून ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मला वाटलं आरोप झाले जे काही होईल ते पाहू. मी बाजूला राहतो करा तुम्ही चौकशी,’ असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर संजय राठोड अडचणीत आले होते. या प्रकरणाशी संबंधीत ऑडिओ, व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आपली बदनामी करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, चौकशीतून सगळं समोर येईल असे राठोड पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला सुपूर्द नेव्ही ...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा येथे सोमवारी आयएनएस (INS) हंसा येथे भारतीय नौदल एविएशनला ‘...

    ‘हिरकणी’च्या कवितासंग्रह प्रकाशनात कवयित...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनाशिक: मराठीचे शिलेदार संस्थेच्या नाशिक येथील प्रसिद्ध कवयित्री आशा गोवर्धने यांच्या ‘हिरकणी’ य...

    चिपी विमानतळाचा वाद; राणेंनी उगाच फुशारक्या मारू नये...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्री...