1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चिपी विमानतळाचा वाद; राणेंनी उगाच फुशारक्या मारू नये: सुभाष देसाई

subhash desai
Spread the love

राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती खुद्द कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

परंतु सध्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक महत्त्वपू्र्ण माहिती दिली आहे. ‘आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत. हा उद्योग विभागाचा विषय आहे. नारायण राणे यांच्याबाबत माहीत नाही. पण कोणाला बोलवायचं याबाबत अजून प्रस्ताव आलेला नाही’ असे देसाईंनी सांगितले.

उद्योग विभाग आणि एमआयडीसीने हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यामुळे आज हे विमानतळ पूर्ण होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबरला उद्घाटन होत आहे’ अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

Claim Free Bets

तर ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतू मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यात पहिली त चौथी शाळा दिवाळीनंतर सुरु?

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमात्र विद्यार्थ्याच्या लसीकरणाचे नियोजन काय? राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने, राज्य सरकारने आता...

    अरेच्चा! समीर वानखेडेच्या नावे ‘बार’ही

    November 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात वाशीमधील ‘त्या’ रेस्ट्रॉ-बारचा उल्लेख राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्य...

    25 हजार कोटींचा घोटाळा हा खोटा आरोप, अजित पवारांचं प...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य...