1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबई दहशतवादी अटक प्रकरण पोलिस सक्षमपणे हाताळतील; गृहराज्यमंत्री

dilip patil
Spread the love

दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील २ दहशतवादी महाराष्ट्राचे असून त्यातला एक मुंबईचा आहे. या कारवाईनंतर राज्यात खळबळ माजली आहे. मुंबई एटीएस पथकाला या अटकेतची माहिती नव्हती का असा सवाल खुद्द गृहमंत्र्यांनी एटीएसला विचारला. याबाबत तातडीची बैठक झाल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसार माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, या अटकेवर एटीएसची नजर असून काम सुरु आहे. पोलिसांना त्यांच्या सोयीप्रमाणे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिस सक्षमपणे हे प्रकरण हाताळतील असंही गृहमंत्री म्हणाले आहेत. भाजपने याबाबत केलेल्या टीकेलाही वळसे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पोलिसांना मदत केली पाहिजे टीका नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. त्याचप्रमाणे हा राजकारणाचा विषय नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या ६ दहशतवाद्यांपैकी २ जण महाराष्ट्राचे होते. त्यातला एक मुंबईच्या सायनमध्ये राहणारा असून त्याला धारावीमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली सेलने ताब्यात घेतलेला आरोपी जान मोहम्मद शेख याच्या पत्नी आणि दोन मुलींना धारावी पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. जान मोहम्मद याच्याकडे शस्त्र पोहचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती,जान मोहम्मदच्या पत्नीकडे तो कुणा कुणाच्या संपर्कात होता याची माहिती घेतली जात आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    संजय राऊत : असे आमचे सरकार कधीही करणार नाही …

    November 25th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकामगार नेते त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील, तर ते हजारो कामगारांचे आणि...

    हिंदीसोबत प्रादेशिक भाषांचा सन्मान व्हावा : भगत सिंह...

    September 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveहिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू व इतर भारतीय भाषांचे परस्परांशी वैमनस्य नाही. सर्व भाषांचा आत्मा एकच आहे. आज ह...

    ‘मस्तं चालंलय आमचं’; म्हणत अजित पवारांनी...

    June 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे: नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भा...