1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कृषी विद्यापीठाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करावा; मुंकद पालटकर

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर: महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाच्यावतीने नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय नागपूर ची जीर्ण इमारत ऐवजी नवीन इमारत बांधण्यास निधी मिळण्यात यावा याकरिता महामहीम राज्यपाल (महाराष्ट्र राज्य ) मुख्यमंत्री, वित्तमंत्री, कृषीमंत्री, कृषी राज्यमंत्री, प्रधान सचिव (कृषी) या सर्वांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

नागपुरातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची इमारत जीर्ण झालेली आहे. ती मागील 166 वर्ष जुनी इमारत आहे. इमारतीचे बांधकाम नवीन करायचे आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून निधी मिळण्यात यावा. अशी मागणी केली आहे. परंतु 1856 मध्ये निर्माण झालेल्या या 166 वर्षात जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतीतच अजूनही कृषी महाविद्यालय सुरू आहे. येथे बीएससी कृषी व एमएससी कृषि हे अभ्यासक्रम सुरू आहे. या इमारतीत कार्यालय प्रयोगशाळा वर्ग कक्ष तसेच इतर विभागही आहेत या महाविद्यालयात आज विद्यार्थ्यांची संख्या बाराशेच्यावर असून कर्मचारी, प्राध्यापक व इतर संस्था गृहीत धरल्यास हा आकडा जवळजवळ तीनशे पर्यंत आहे. राणी महाल या नावाने प्रख्यात ही इमारत हेरिटेज दर्जाची आहे. या इमारतीचे नूतनीकरण यथाशिग्र आवश्यक आहे.

पुणे येथे कृषी महाविद्यालयाची इमारततिचे नूतनीकरण यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटीचे अनुदान देवून पुन्हा पुननिर्माण केले. परंतु नागपूर कृषी महाविद्यालय इमारतींच्या अनुदाना बाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. कृषी महाविद्यालय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले, मुली शिक्षण घेत असतात. तसेच हजारो कृषी स्थातकोत्तर व पीएचडी विद्यार्थी 116 वर्षात तयार झाले आहेत. या इमारतीची अधिक दुरावस्था झाली असून इमारतीचे छत, टॉवर, फरशांचे छत, मनोरा, लोखंडी बार, कवेलू, प्लास्टर त्याचप्रमाणे भिंतीला पडलेल्या भेगा व सज्जे अधिक धोकादायक आहेत. कधीही धोका होऊ शकतो राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी केली आहे.

इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक अनुदान मंजूर करण्यात यावा. जेणेकरून पुढील अघटित घटना टाळता येऊ शकेल जनहिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार व्हावा व शासनास याबाबत शिफारस व्हावी. अशी विनंती या संघटनेने केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘तुम्ही राज ठाकरेंच्या नादी लागू नका, अन्यथा..’, राम...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआगामी मुंबई महानगरपालिका निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. पालि...

    मध्यप्रदेशात पदवी अभ्यासक्रमात ‘रामचरितमानस...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा तुलशीदासचे “रामचरितमानस” भाग असेल. तसेच रामसेतूबद्दल...

    SC ने महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभराचे...

    January 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी(२८...