1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोदीविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच शरद पवार

Spread the love

संजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य

देशात मोदींविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार होय. दुसरा कोणताही पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. आम्ही सगळेच त्यांचा आदर करतो, सन्मान करतो. देशातल्या विरोधी पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशातील विरोधी पक्ष एकत्र यावेत, समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी नक्कीच काही भूमिका ठरतायत, काही हालचाली ठरतायत. आणि शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन याबाबतीत नेहमी लाभत असते. त्यांच्या मनात काय आहे, हे आम्ही समजून घेऊ. शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय किंवा विरोधी पक्षाची एकजूट होऊ शकत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक प्रमुख नेते आहेत. जे सक्षम आहेत. त्या एकजुटीचे नेतृत्व करण्यासाठी. मात्र, या आघाडीचे नेतृत्व करण्यात शरद पवारांनी पुढे यावे, असे आम्हाला वाटते.

शिवसेना मेरीटमध्ये आली…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची ढ टीम असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोणती कोणाची टीम हा त्यांचा प्रश्न आहे. काय बोलायचे काय नाही ते. तोंडाच्या कोणत्या वाफा दवडायच्या ते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मिरीटमध्ये आलेली आहे, म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. ज्या राज्याचे नेतृत्व शिवसेना करते, शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो, याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळते.

मुख्यमंत्री टॉप लिस्टमध्ये…

संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेमध्ये निर्णय घेण्याची उत्तम क्षमता आहे. आणि शिवसेनेला, मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या लोकांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातल्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आलेले आहेत. हे जर कुणाला कळत नसेल, तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षाही खाली मानावा लागेल. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांच्या दृष्टीने शिवसेना ही मेरीट लिस्टमध्ये आलेली आहे. आता कोणाला काय बोलायचा हा त्यांचा प्रश्न.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कीर्तनाला झाली गर्दी; शीवलीला पाटीलवर गुन्हा दाखल

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

    ‘नवांकुर’कार निर्मला मचाले-पवार यांचा शि...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंदापूर: येथील शिक्षण विभागातर्फेआज ४|९|२०२१ रोजी इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी मा.राजकुमार बामणे, सणसर बिटचे व...

    ‘तो कार्यक्रम मनसेचा नाही’ वसंत मोरे नार...

    April 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमनसेकडून (MNS) उद्या पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (...