1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राजस्थान सरकारने मागे घेतले वादग्रस्त बालविवाह नोंदणी विषयक विधेयक

Spread the love

बालविवाहांसह लग्नांच्या अनिवार्य नोंदणीच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक राजस्थान सरकारने गेल्या महिन्यात मंजूर केले होते. सरकारने या विधेयकात २००९ च्या विवाह नोंदणी कायद्यात सुधारणा केली होती. त्यानुसार राज्यात बालविवाह झालेल्या वधू -वरांच्या लग्नाची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले होते. या नव्या विधेयकाअंतर्गत वधू-वराच्या आई-वडिलांनी किंवा पालकांनी लग्नाच्या ३० दिवसांच्या आत बालविवाहाची माहिती सादर करणे बंधनकारक होते.

दरम्यान, विरोधकांनी हे विधेयक पारित झाल्यानंतर सरकार बालविवाहास प्रोत्साहन देत असल्याचे म्हणत राजस्थान विधानसभेतून वॉकआऊट केले होते. विधेयक पारित केल्यानंतर सतत होणाऱ्या टीकेमुळे आता अशोक गेहलोत सरकारने हे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांकडून हे विधेयक परत मागवणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असते. पण, त्यापूर्वीच राजस्थान सरकराने विधेयक माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त राजस्थान सरकारने हे वादग्रस्त विधेयक सर्वच स्तरातून टीका होत असताना मागे घेण्याची घोषणा केली. राज्यपालांच्या मंजुरीसाठी हे विधेयक अद्याप प्रलंबित होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून हे विधेयक मागे घेत असल्याचे सांगितले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    एअर इंडिया 70 वर्षानंतर टाटांकडे परतले, जाणून घ्या य...

    October 9th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveजवळवळ ७० वर्षानंतर सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाचे दायित्व आता परत टाटा समूहाच्या हातात आले आहे. टाटा सन्स या...

    पंजाबात गुजरातचा प्रयोग होणार? हायकमांडने केली अमरिं...

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चालला असून यातच पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत...

    नागरी सेवा दिनी प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मोद...

    April 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि २१ एप्रिल रोजी नवी दिल्लीत व...