1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाविकास आघाडीला उखडून टाकण्याची भाषा करू नका

nawab malik
Spread the love

आम्ही खपवून घेणार नाही; नवाब मलिक यांचा भाजपाला इशारा

त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी दंगली घडल्या त्यामागे भाजपचाच हात आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले. त्यांच्यावर आज कारवाई होत आहे. भाजप राष्ट्रीय नेते सांगतात महाराष्ट्रातून आघाडी सरकार उखडून टाकू. सरकार उखडून टाकायचे भाषा त्यांनी करू नये, महाराष्ट्रातील जमिनीवर ते खपवून घेणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपचे सर्व शस्त्र जेव्हा संपतात तेव्हा भाजप दंगली घडवण्याचे शस्त्र बाहेर काढते. अमरावती येथे अशाच प्रयत्न केला गेला. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले. यासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात पैसे गेले. आज त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता अशा प्रकारचे हीं स्वरूपाचे राजकारण भाजपकडून केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

नांदेड, अमरावती आणि मालेगावातही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला गेला. यामागे नक्कीच भाजपचा हात आहे. ज्यावेळी कोणतेच शस्त्र भाजपकडे नसेल त्यावेळी ते अशा प्रकारचे दंगलीचे राजकारण करते. त्यानंतर दुसरे शस्त्र काढले जाते तपास यंत्रणांच्या माध्यमातून लोकांना भीती दाखवायची. त्याच्या माध्यमातून दबाव टाकायचे. भाजपला आम्ही एकच सांगतो कि अशा प्रकारचे हीन राजकारण करू नये. महाराष्ट्रातील जनतेला आता चांगले कळू लागले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

Claim Free Bets
    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जगातील सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत ‘महारा...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची...

    शिवसेनेचा ‘संजय’ जिंकू शकणार नाही; आशीष ...

    June 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज दि ५ जून रोजी भाजपच्या (BJP) दोन बैठका पार पडल्या. या बैठकीत ...

    अभिनेता शाहरुख खानला झाला मोठा तोटा

    October 9th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveड्रग प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुखला मिळणाऱ्या बायजुच्या जाहिराती त...