1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“त्या शेतक-यांच्या कुटुंबांना ताबडतोब न्याय द्या”

Spread the love

प्रियंका गांधीची मोदी सरकारकडे मागणी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची काल घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने आता लखीमपूर खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ताबडतोब न्याय द्या, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे.

प्रियंका गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. त्यांनी म्हटले की, गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय 700 हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही प्रियंका यांनी म्हटले.

Claim Free Bets

पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली. सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेले खटले मागे घ्यावेत आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी न्याय मागणीही प्रियंका गांधींनी केली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पर्यावरणीय प्रश्नाचा सामना करण्यासाठी ‘पंचामृत...

    November 3rd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील हवामान बदल शिखर COP 26 परिषदेला संबोधित केलं...

    भारतात घुसणा-या पाकिस्तानी बोटीसह 12 जण अटकेत

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय तटरक्षक दलाने गुजरातमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीला पकडलं आहे. तसेच, या बोटीवर असलेल...

    राज्यसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी; संजय राऊत

    June 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात दि.10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय हालचाली तीव्र झाल्या ...