गीतकार जावेद अख्तर यांनी आर्यन खान प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी गुजराजमधील मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या कोट्यवधीच्या कोकेनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एनसीबीच्या मुंबईतील पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील समुद्रात असलेल्या एका जहाजावर धाड टाकली होती. ड्रग्ज पार्टी उधळून लावत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. या प्रकरणानंतर गुजरातमध्ये साडलेल्या ड्रग्ज प्रकरणाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांवर जावेद अख्तर यांनी भूमिका मांडली.