1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले

Spread the love

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नेहमी महाविकासाआघाडी सरकारवर टीका करत असतात. या ना त्या कारणाने ते नेहमी राज्यसरकारला कैचीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील आरोग्य विभागाच्या कारभारावरून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबरला परिक्षा आयोजित करुनही आता या परिक्षेच्या नियोजनातही आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन दिसून आल्याचा आरोप खोत यांनी केला आहे.

‘२४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र देण्यात आले आहे. सर्वात विचित्र बाब म्हणजे सकाळच्या सत्रात होणारा पेपर एका जिल्ह्यात तर दुपारच्या सत्रात होणारा पेपर दुसऱ्या जिल्ह्यात असे परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. हा प्रकार लक्षात आल्याने परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांनी तीव्र संताप केला आहे.

Claim Free Bets

अशा परिस्थितीत उमेदवार एका जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावरुन दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर २-३ तासांत कसा पोहचणार, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. मला वाटतं की तुम्ही ठरवलं आहे, की जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ, म्हणत खोत यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दिल्लीशी नरीमन पॉईंट जोडणार; गडकरींचं स्वप्न

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील नरीमन पॉंईंटपासून ते थेट दिल्लीपर्यंत सागरी सेतू बांधण्याचे माझे स्वप्न आहे. तसेच मुंबईतील सी लिंक...

    ‘मग महाराष्ट्र सरकारने मुंबई – पुणे द्रु...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूपीए सरकारने ७० वर्षांच्या काळात उभ्या केलेल्या सर्व गोष्टी भाजप...

    कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही बळजबरी करता येणार नाही...

    May 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनवी दिल्ली- देशातील कोरोना लसीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी कोण...