1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway      2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

Spread the love

आज दिनांक ६ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. याशिवाय, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपती म्हणाले, सुरक्षा प्रोटोकॉल काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

याच मुद्द्यावर पंजाबमधील चन्नी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी चन्नी सरकारने उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल तयार करेल. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या समितीत निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.

Claim Free Bets

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. येथे कारने हुसैनीवाला येथे जात असताना आणि हुसैनीवाला शहीद स्मारक 30 किलोमीटर अंतरावर असताना, एका पुलावर पंतप्रधानांचा ताफा पोहोचल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी अचानकपणे रस्ता अडविला. जवळपास 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडविण्यात आला. यानंतर, हुसैनीवाला येथे जाणे रद्द करून पंतप्रधानांचा ताफा भटिंडा येथे परतला आणि भटिंडा येथून विमानाने पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटी संदर्भात माहिती घेतली. राष्ट्रपतींनी या गंभीर चुकीविषयी चिंता व्यक्त केली आहे, असे ट्विटरवरून आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावर 7 जानेवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    लष्करातील ३९ महिलांना सर्वाच्च न्यायालयाचा दिलासा; म...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलष्करातील ३९ महिला अधिकाऱ्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या महिला अधिकाऱ्यांना एका ...

    निवडणुकीचा मार्ग मोकळा

    July 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून बांठिया आय...

    भारतीय सैनिक शहीद होताहेत; तरी पाकीस्तिनसोबत टी-20 स...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveओवैसींचा भाजपाला सवाल भारतात मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ...