1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतात गडगडाटी वादळ आणि विजेमुळे ७८७ लोकांचा मृत्यू

Spread the love

नागपूर: २०२१ हे वर्ष १९०१ नंतरचे भारतातील पाचवे सर्वात उष्ण वर्ष होते, देशातील वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.४४अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, असे भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) शुक्रवारी सांगितले.

देशात वर्षभरात पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, भूस्खलन, वीज पडणे यासारख्या हवामान बदलाच्या घटनांमुळे १,७५० मृत्यू झाल्याची नोंद आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

“२०२१ हे वर्ष १९०१ पासून २०१६, २००९, २०१७ आणि २०१० नंतरचे पाचवे सर्वात उष्ण वर्ष होते. देशासाठी वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.४४ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले,” असे हवामान खात्याच्या वार्षिक हवामान विधाना २०२१ मध्ये नमूद केले आहे.

Claim Free Bets

“हिवाळ्यात उबदार तापमान आणि पावसाळ्यानंतरच्या हंगामात प्रामुख्याने यामध्ये योगदान दिले, २०१६ मध्ये, देशामध्ये वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.७१० अंश सेल्सिअस जास्त होते, ते २००९ आणि २०१७ च्या सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे ०.५५० अंश सेल्सिअस आणि ०.५४१ अंश सेल्सिअस जास्त होते.

२०१० मध्ये, वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.५३९अंश सेल्सिअस होते, असे त्यात म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितल्यानुसार २०२१ मध्ये भारतात गडगडाटी वादळ आणि विजेमुळे ७८७ लोकांचा मृत्यू झाला, तर त्यावर्षी अतिवृष्टी आणि पूर-संबंधित घटनांमध्ये ७५९ लोकांचा मृत्यू झाला, असे त्यात म्हटले आहे. चक्रीवादळामुळे १७२ लोकांचा मृत्यू झाला आणि इतर तीव्र हवामानाच्या घटनांमुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची त्यात नोंद आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “आरएसएस शाखेत प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्य...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांन...

    ‘वीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच ...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या स...

    हिंदू अल्पसंख्याक प्रकरणाचे शपथपत्र सॉलिसिटर जनरलनी ...

    March 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकाही राज्यांमध्ये हिंदूंची संख्या ही इतर समुदायांपेक्षा कमी आहे अशा राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा...