1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

घर तोडण्यासाठी उद्धव ठाकरे यत्न करत आहेत; नारायण राणेंचा आरोप

Uddhav Thackeray-thefreemedia
Spread the love

नागपूर: बाळासाहेब ठाकरे यांचे संरक्षण करण्याचे काम आयुष्यभर केलेल्या नारायण राणे यांचे राहते घर तोडण्यासाठी त्यांचाच मुख्यमंत्री मुलगा उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहेत ,असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

ही गोष्ट जुन्या कडवट शिवसैनिकांना आवडलेली नसल्याचे ही ते यावेळी म्हणाले, आदीश बंगल्याजवळ मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे बंगल्यात उपस्थित आहेत. तर मालवणच्या नीलरत्न बंगल्याबाबत अद्यापही आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. असे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना सांगितले.

आमदार नितेश राणे आज ओरोस पोलिस ठाण्यात हजेरी लावन्यासाठी आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. नितेश राणे म्हणाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची नारायण राणे यांनी जीवाच्या पलीकडे आयुष्यभर सेवा केली. मात्र त्याबाबत कोणतीही जाणीव न ठेवता बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राणे यांचे घर तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हे आदेश केंद्र सरकारचे आहेत की केंद्राचे नाव सांगून राज्य सरकारच काही गडबड करते आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

आदिश बंगल्याच्या बाहेर मुंबई महानगरपालिकेचे पथक पोचलेले आहे. मात्र नीलरत्न बंगल्याबाबत अद्यापही आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही.

आदिश बंगल्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित आहेत. ते या पथकाला योग्य ती माहिती देतील असे म्हणाले.

Claim Free Bets

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ आहे, मात्र महाराष्ट्रातील जनतेला भेटायला वेळ नाही. जनतेचे प्रश्‍न सोडवायला वेळ नाही. अशी टीका देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीवर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. आदित्य ठाकरे हे याठिकाणी फोटोसेशन करायला येत आहेत? की बंगला किती पडला हे यला येत आहेत ? असेही त्यांनी यावेळी उलट प्रश्न विचारले. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री म्हणून या जिल्ह्याच्या स्वतंत्र दौऱ्यावर ते अडीच वर्षानंतर आले आहेत. मागे जाताना किमान काहीतरी पॅकेजची घोषणा करून त्यांनी जावे असे देखील नितेश आणि यावेळी म्हणाले

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी; पा...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे ...

    ‘हिंमत असेल तर आघाडी सरकारचा पाठींबा काढून दाख...

    June 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveबीड : राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असे तुम्ही सांगत आहात. खंजीर खुपसल्यामुळे तुम्ही रक्तबंबाळ झालात, तरीही तु...

    ‘मस्तं चालंलय आमचं’; म्हणत अजित पवारांनी...

    June 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे: नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भा...