1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तिन्ही कृषी कायदे मागे घेणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

narendra modi1
Spread the love

दीड वर्षांच्या काळानंतर करतारपूर कॉरिडॉर पुन्हा खुला झाला आहे. जगण्यात सेवेचा मार्ग स्वीकारल्याने आयुष्य सफल होते . याच भावनेने सरकार काम करते आहे. गेल्या अनेक पिढ्यांनी पाहिलेली स्वप्ने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

शेतकऱ्यांच्या समस्या मी पाहत आलो आहे. २०१४ साली मला जेव्हा पीएमपदातून सेवेची संधी दिली. तेव्हापासून कृषी या विषयाकडे विशेष लक्ष दिले आहे. १०० पैकी ८० शेतकरी हे दोन एकरपेक्षा कमी जमीन असणारे आहेत. बीज, विमा, बाजार आणि बचत या बाबींवर चारीबाजूंनी सरकारने काम केले आहे.

कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १० कोटींहून अधिक आहे. पीक विमा योजनेला अधिक प्रभावी केले आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना १ लाख कोटींपेक्षा जास्त पैसे देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने प्रयत्न केले. सध्याचे कृषी क्षेत्रााचे बजेट गेल्या काही वर्षांपेक्षा पाच पटीने वाढवले आहे. पीक कर्ज १६ हजार कोटींवर पोहोचवलं.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी, न्यायासाठी सातत्याने पावले उचलत आहोत. शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती चांगली व्हावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे लागू करण्यात आले. शेतकऱ्यांचा विकास व्हावा, त्यांना योग्य भाव मिलावा, योग्य बाजारपेठ उपलब्द व्हावी, यासाठी कृषी कायदे आणण्यात आले. विचारांती, तज्ज्ञांशी बोलून, संसदेत चर्चा करुन हा कायदा करण्यात आला. देशातल्या हजारो शेतकरी संघटनांनी याचे स्वागत केले, त्यांचे धन्यवाद.

Claim Free Bets

लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या हितासाठी, गावांच्या हितासाठी सत्यनिष्ठेने, शेतकऱ्यांप्रति प्रामाणिक हेतूने कायदे करण्यात आले होते. मात्र तरीही काही शेतकऱ्यांनी त्याला विरोओध केला, आम्ही त्यांना समजावू शकलो नाही. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याबाबत प्रयत्न करण्यात आले, कायद्यात बदल करणे, दोन वर्षे स्थगितीचाही पर्याय दिला होता. सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण झाले. देशवासियांची क्षमा मागून, पवित्र ह्रद्याने सांगतो की आमच्या तपश्चर्येत काही कमा राहिल्याने शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काश्मिरी पंडित समुदायाचे काश्मीरमध्ये पुनर्वसन

    July 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: जम्मू-काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या विकास पॅकेजअंतर्गत काम करणा...

    पिंपरीतील भुजबळ चौकातून 7 लाख किंमतीचा 30किलो गांजा ...

    November 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुन्हेगारीसाठी घटनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 7 लाखाहून अधिक किंमतीचा 30 किलो गांजा प...

    काल दिवसभरात १६,३२६ कोरोनाबाधितांची नोंद, तर ६६६ रुग...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात काल दिवसभरात १६ हजार ३२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ६६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याच...