1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काँग्रेसच्या हस्तक्षेपामुळे विकास कामे खोळंबली :सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे

Avinash-Thakre
Spread the love

आज दि. २ सप्टेंबर रोजी नागपूर महानगरपालिका सत्तापक्ष कार्यालयात सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची पत्रकार परिषद दुपारी ४.३० च्या सुमारास पार पडली. त्यात त्यांनी विविध राबविलेले प्रकल्प, मनपा निवडणूक, शहर विकासाची कामे याविषयी ते बोलले. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर आरोप देखील लावले.

वर्ष २०१४ ला महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर नागपूर शहराचा अत्यंत वेगाने विकास झाला. शहरात सिमेंटचे रस्ते, बगीचे ५७२ व १९०० ले आऊटमधील नागरी सुविधाची विकास कामे वेगाने सुरु झाली व नागरी शहराचा चेहेरा मोहरा बदलू लागला. याकरिता सरकारकडून हजारो करोडो रुपये देखील अनुदाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत होते, त्यामधून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होत्या. पण २०१९ ला राज्यात सत्ता परिवर्तन झाले व राज्य सरकार कडून सूडबुद्धीने राजकारण सुरु झाले. प्रशासनाचा वापर करून नागपूर शहराची विकास कामे थांबविण्यात आली, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी नागपूर शहरातील प्रमुख रस्त्याविषयी ते बोलले. राज्य सरकारने निधी मंजूर केले होता. पण नवीन सरकारने तो थांबविल्याबरोबेर त्याला ब्रेक लागला. एकूण १२० करोड रुपयात, ५७ करोड रुपये महानगरपालिकेचे होते, शासनाचे ३५ करोड आणि एनआयटीचे ३५ करोड रुपये अजून मिळायचे असल्याचेही ते बोलले.

डाँबरीकरण रस्त्याना गेल्या दोन वर्षात फक्त नगरसेवकांच्या प्रायॉरीटी (प्राधान्यानुसार) त्यांना मंजुरी दिली होती. यात पंधरा लाखांचे अंतर्गत रस्ते सामील होते आणि आयुक्तांनी मंजुरी न दिल्यामुळे डांबरीकरणाचे जास्तीत जास्त काम थांबले असे ते म्हणाले.

Claim Free Bets

“आमचा आरोप असा आहे कि एकीकडे राज्य सरकार अनुदान देत नाही, निधी देत नाही. महानगरपालिकेचा जो निधी आहे त्यातून जी विकास काम करायची त्याला आयुक्त मंजुरी देत नाही आणि काँग्रेस नेते महानगरपालिकेवर आरोप करतात,अशी दुहेरी नीती सुरु आहे. काँग्रेसच्या हस्तक्षेपामुळे महानगरपालिका विकास काम खोळंबली आहे” असं सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे म्हणालेत.
नागपूर शहराचा विकास थांबला राज्य सरकारने अनुदान थांबविले म्हणून जनता मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली असं सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे म्हणालेत.

तसेच नागपुरातील मनीषनगर अंडरपास विषयी सीसीटीव्ही, आणि सुरक्षा निकष विषयी त्यांनी स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिल्याचे ते म्हणाले तसेच याविषयी मेट्रोलाही सांगितले आहे असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत जिंकून आल्यास शहरात नवीन प्रकल्प राबवू, विकास काम करू, तलाव तसेच नाग नदी पुनरुज्जीवन करू असे त्यांनी ‘द फ्री मीडियाला’ सांगितले.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कॅबिनेट बैठकीत शिंदेंचे महत्त्वाचे १३ निर्णय कोणते?

    July 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत २७ जुलै रोजी राज्यातील विविध विभागांब...

    नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveत्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे...

    ‘शरद पवारांच्या आशीर्वादानेच अनिल देशमुखांनी ग...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकड...