1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“….असच चालू राहिले तर, हे लोक एक दिवस सावरकरांना राष्ट्रपीता बनवतील”

Veer savarkar
Spread the love

राजनाथ सिंह यांच्यावर ओवैसींची टिका

हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. तर, राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सडकून टीका केली आहे.

“हे लोक चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना काढून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवती,” अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी राजनाथ सिंह आणि भाजपवर केली आहे.

“सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो.

तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उत्तराखंडमध्ये होणार कॉंग्रेसचे पुनरागमन; रावत

    February 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत 70 पैकी कॉंग्रेसला किमान 48 जागा मिळतील असा विश्‍वास या पक्षाचे नेत...

    एम्स रूग्णालयातील कोट्यवधीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशभरातील नामांकित रुग्णालय म्हणून ओळख असलेलं याशिवाय राजकीय नेत्यांपासून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ज्या रुग्ण...

    जावेद अख्तर म्हणाले, अब्जावधीच्या कोकेनची बातमी हेडल...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगीतकार जावेद अख्तर यांनी आर्यन खान प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी गुजराजमधील मुंद्रा पोर...