1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे ‘ते’ मासिक बाजारात दिसलेच नाही !

Spread the love

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील राजकीय हाडवैर अखंड देशाने पाहिलं. दोघांनी एकमेकांवर मनसोक्त टीका केली. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर तर हे वैर टोकाला गेले. बाळासाहेब हे शरद पवार यांचा उल्लेख ‘मैद्याचे पोते’ असा करत तर पवार बाळासाहेबांचा उल्लेख ‘मावशी’ असा करत; पण याही पलिकडे दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही रंगतात.

राजकारणापलिकडे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती. ही मैत्री दाेघांनी नेहमी जपली. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एक मासिक काढायचे ठरवले. त्यावेळी टाइम या मासिकाची मोठी चर्चा होत असे. बाळासाहेब व्यंगचित्रकार आणि मार्मिक लेखनासाठी ओळखले जात होते. टाइमच्या धर्तीवर राजकीय विषयांना वाहिलेले राजनीती हे मासिक त्यांनी सुरू करायचे ठरविले.

अतिशय कष्ट घेऊन त्यांनी या मासिकाचा पहिला अंक काढला. त्यानंतर तो अंक अगदी भक्तिभावाने सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण केला. त्यानंतर हे दोघेही ठाकरे यांच्या बहिणीकडे गेले. त्यांची बहीणाच्‍य ‘अंगात’ येत होते. त्यांना या मासिकाचे भविष्य काय असेल असे विचारले. ‘हा अंक बाजारात दिसणार नाही’ म्हणजेच तो भरमसाठ खपेल, असे भविष्य त्‍यांनी सांगितले. शरद पवार हा किस्सा अगदी खुमासदार पद्धतीने सांगतात. ‘ठाकरे यांच्या बहिणीचे भविष्य खरे ठरले. खरंच तो अंक बाजारात दिसला नाही. कारण पुढचा अंकच निघाला नाही,’ असे मिश्किलपणे शरद पवार सांगतात.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अक्षरश: आभाळ फाटल्याचा अनुभव घेतला औरंगाबादकारांनी

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला शनिवारी पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस अन् वीजांच्या कडकडाटाल...

    अरुण हलदरांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार; नवाब मलिक

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आ...

    मुंबईत १० जुलैपर्यंत १४४ कलम लागू

    June 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गदारोळात मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...