1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 2024 पर्यंत बनवता येणार पक्की घरं

PM-modi
Spread the love

प्रधानमंत्री आवास योजनेला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ

देशातील जनतेच्या कल्याणासाठी शासनाला विविध योजना तयार कराव्या लागतात. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येतील मोठा भाग ग्रामीण आणि गरीब आहे. त्यांचा विचार करून शासनानं पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण म्हणजेच पीएमएवाय-जी (PMAY-G) आणखी काही वर्षे सुरू ठेवण्याचा विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (8 डिसेंबर 21) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळीच मंत्रिमंडळानं पीएमएवाय-जी मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.

पीएमएवाय-जी अंतर्गत ग्रामीण भागात सर्वांना घरं उपलब्ध करून दिली जातील. ग्रामीण भागातील साधारण 2.95 कोटी लोकसंख्येसाठी पक्की घरं बांधावी लागतील असा अंदाज 2016मध्ये वर्तवण्यात आला होता. यापैकी अनेक कुटुंबांना घरं देण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी दिली. 1 कोटी 67 लाख घरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

उर्वरित कुटुंबांनाही पक्की घरं मिळावीत यासाठी 2024 पर्यंत पीएमएवाय-जी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. सरकारी निवेदनानुसार, या योजनेअंतर्गत उर्वरित 1.55 कोटी घरांच्या बांधकामासाठी 2.17 लाख कोटी रुपयांचा खर्च होईल. ज्यामध्ये केंद्र सरकारचं 1.25 लाख कोटी रुपये आणि राज्यांचं 73 हजार 475 कोटी रुपयांचं योगदान असेल. या अंतर्गत नाबार्डला (NABARD) अतिरिक्त व्याजाची परतफेड करण्यासाठी 18 हजार 676 कोटी रुपयांची अतिरिक्त गरज भासेल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    डिमार्टचे सीईओ इग्नेशियस नरोन्हा झाले अब्जाधीश

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love४७ वर्षीय नरोन्हा, भारताचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापक भारतभर डिमार्ट रिटेल स्टोअर्स चालवणाऱ्या अ&...

    जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोवर शस्त्रे खाली ठेवू नका’...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताने काल १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. तसेच दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नर...

    एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणा-या; अवनी लेखराने पॅराल...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचत वैयक्तिक दुसरे पदक जिंकले आहे. तिने एक...