1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर

Spread the love

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. २३ नोव्हेंबरला दुपारी ४.१५ वाजता नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन होईल. २४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता ते अमरावतीला निघतील. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर राज्यपाल नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ येथे भेट देतील. त्यानंतर पापळ येथून यवतमाळकडे निघतील. यवतमाळ जिल्ह्यातील निलोना येथील दीनदयाल प्रबोधिनीला राज्यपाल भेट देतील व यवतमाळ येथे मुक्काम करतील.

२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ यवतमाळ येथील गोधनी रोडवरील प्रयास वन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल तसेच स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळी आयोजित प्रार्थना व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर इंग्रजी माध्यम शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण व आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते होईल. दुपारी ३च्या दरम्यान राज्यपालांचे यवतमाळ येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी तीनला मुंबईकडे जाण्यास निघतील.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद ; ठिकठिकाणी ...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे. विदर्भातही पावसाने हाहाकार माजवला आहे. गे...

    विदर्भात अतिवृष्टी पूरपरिस्थिती कायम; राज्य आपत्ती द...

    July 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र राज्यामध्ये मागील ७ ते ८ दिवस अतिवृष्टीमुळे सतत मुसळधार पाऊस होत असल्याने विदर्भातील नाग...

    आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने राजमाता जिजाऊंना आदर...

    January 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे; पंरतु माझ्या घरी नाही, शेजारच्या घरी. ही धारणा आजच्या जिजाऊंच्या लेकी...