1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’ घोटाळ्याची चौकशी सुरु

Spread the love

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जलयुक्त शिवार योजना हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’मानला जातोय. पण या योजनेत अनेक ठिकाणी घोळ असल्याचा ठपका महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला. त्यामुळे राज्य सरकारने त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले. त्यामुळेच अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील १९८ प्रकरणांची उघड चौकशी अमरावती एसीबीकडून सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जलयुक्त शिवार योजनेमुळे शेती तसेच गावांच्याही भूजल पातळीत वाढ व्हावी हा मुख्य उद्देश होता. पण, योजनेत अनेक ठिकाणी घोळ झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवून काही महिन्यांपूर्वीच एक समिती नेमली व समितीने संपूर्ण राज्यात दौरा करून तक्रारींची पडताळणी केली. त्यावेळी समितीने राज्यात एकूण ९२४ ठिकाणी जलयुक्त कामात ‘गडबड’ झाल्याचा ठपका ठेवून अहवाल राज्य शासनाकडे सोपवला होता.

दरम्यान, शासनाने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश एसीबीला दिले होते. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आता खुल्या चौकशीला सुरूवात केली आहे. यात १० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १६६ कामांची चौकशी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने सिंदखेड राजा व खामगाव तालुक्यातील ही कामे आहे. यात प्रथम दहा लाखांच्या कामांची चौकशी सुरू करण्यात आली असली तरी इतर कामांची चौकशी पुढील निर्देशानुसार करण्यात येणार आहे. या कामांमध्ये खडकपूर्णा प्रकल्पातील काही कामांचाही समावेश आहे. सध्या ३६ कामांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोदीविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच शरद पवार

    April 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसंजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य देशात मोदींविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार होय. ...

    राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला; देवेंद्र ...

    May 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनगपूर: मध्यप्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट केली म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली. महाराष्ट्राने ‘ट...

    ‘दूरसंचार’ साठी मोदी सरकार मोठी घोषणा कर...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआज मोदी सरकार कोरोना संकटाच्या वेळी डबघाईला आलेल्या कापड क्षेत्राला मदत पॅकेज देऊ शकते. याशिवाय दूरसंचार क्...