1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अफगाणिस्थानच्या मुद्द्यावर ७ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची आज दिल्लीत बैठक

Spread the love

प्रकाश आंबेडकर यांचा दावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात फसवल्याचं दिसत आहे. माझी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की, त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. त्यांनी कायद्याला सहकार्य केले तर ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
यांनी केला.

उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणावरुन प्रकाश आंबेडकरांनी हा दावा केला आहे. नागपूर येथील रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ”या प्रकरणात दाखवलं एक जातय आणि करतयं दूसरचं, असा प्रकार सुरु आहे. आता हा प्रकार थांबवला पाहिजे, असं मला वाटतय, अन्यथा राज्यपालांनी यात लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी मागणी आम्ही करणार आहोत, अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे.

”अनिल देशमुख या प्रकरणात फसले गेले आहेत, कलेक्शन झाले असल्याची माहिती विभागाकडून मिळते. पण चौकशी यंत्रणेला देशमुखांकडे पैसे मिळालेले नाही, मग हे पैसे कोणाकडे गेले, वसुलीतून जे पैसे जमा झाले, ते कोणाकडे गेले, याचा खुलासा अनिल देशमुखांनी करायला हवा. त्यांनी कायद्याला सहकार्य केल्यास, ते माफीचा साक्षीदार होऊ शकतात आणि त्यांची सुटका होऊ शकते. १०० कोटी वसुली प्रकरणात मोहरे समोर येत आहेत; पण मुख्य वजीर आणि राजा समोर येत नाही. पोलीस यंत्रणाही त्यांना समोर आणत नाही. त्यामुळे राज्यपालांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा; प्रज्ञासिंह ठाकूर

    February 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून देशातलं राजकीय वातावरण हिजाब प्रकरणावरून तापू लागलं आहे. कर्नाटकमधून सुरू झालेल्या य...

    एम्स रूग्णालयातील कोट्यवधीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशभरातील नामांकित रुग्णालय म्हणून ओळख असलेलं याशिवाय राजकीय नेत्यांपासून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ज्या रुग्ण...

    इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली

    November 10th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप केंद्र सरकारची अवस्था केविलवाणी असून त्यांनी भारतातील जनतेची अवस्थाही केव...