1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जम्मू-काश्मीरमध्ये नवी दहशतवादी संघटना सक्रीय; भाजप, आरएसएससह 200 लोक निशाण्यावर

terrorist
Spread the love

जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी पुन्हा एकदा दहशत पसरवण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर अहवालामध्ये हे उघड झाले आहे की, दहशतवाद्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये टारगेट किलिंगसाठी 200 लोकांची लिस्ट तयार केली आहे. या लिस्टमध्ये माहिती देणारे, गुप्तचर संस्था, केंद्र सरकार आणि लष्कराच्या जवळ मानले जाणारे मीडियातील व्यक्ती, खोऱ्याबाहेरील लोकं आणि काश्मिरी पंडितांची नावे त्यांच्या वाहनांच्या संख्येसह समाविष्ट आहेत.

21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या बैठकीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल बद्र यासह अनेक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी सहभागी होते. या अहवालात असे म्हटले आहे की, सर्व संघटनांच्या लोकांमध्ये सामील करून एक नवीन दहशतवादी संघटना स्थापन केली जाईल. जे केवळ माहिती देणारे, गुप्तचर संस्थेची लोकं, खोऱ्याच्या बाहेरची लोकं आणि RSS आणि भाजपच्या लोकांना लक्ष्य करतील.

या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, येत्या काळात ही संघटना खोऱ्यातील टारगेटेड किलिंग्सची जबाबदारी घेईल. यासाठी उरी आणि तंगधर मार्गे सीमेपलीकडून ग्रेनेड आणि पिस्तूले पाठवली जात आहेत. 5 ऑक्टोबर रोजी झालेली रस्त्यावरील विक्रेता वीरेंद्र पासवानची हत्या ही चुकीच्या ओळखीचे प्रकरण असू शकते, असेही अहवालामधून स्पष्ट झाले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बिहार नेहमीच लोकशाही आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाप...

    July 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला स...

    कोजागिरीनिमित्त 5 लाख लिटर दुधाची होणार विक्री

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात आतापर्यंत कोरोनामुळे सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. आता सर्वत्र निर्बंध हटविण्यात...

    ५ वर्षांनंतर भारतातून पेट्रोल नाहीसे होईल, असा दावा ...

    July 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशात इंधनाच्या किंमती वाढत असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुर...