1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही; एकनाथ शिंदे

Eknath Shinde-thefreemedia
Spread the love

विरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्र्याचा टोला

नाशिक : मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने वारंवार दिल्लीवारी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अजितदादा गडचिरोली दौऱ्यावर थोडे उशिरा पोहोचले. देवेंद्र फडणवीसांसोबत मी गडचिरोलीच्या टोकाला गेलो होतो. पूर ओसरल्यानंतर अजितदादा गेले आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथे जेव्हा पूर परिस्थिती होती, तेव्हा फिरत होते. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. यंत्रणा लोकांच्या मदतीला आहे. युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे करण्याचा आदेश दिलेले आहेत,”

दरम्यान, अजित पवार यांनी नुकतीच गडचिरोली येथे पुरग्रस्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे प्रत्युत्तर दिले.

काल अजित पवार म्हणाले होते की मुख्यमंत्री शिंदे म्हणतात सरसकट पंचनामे करायला सांगितले पण शेतकरी म्हणतात पंचनामे झाले नाहीत. दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यावर उपाययोजना व्हायला हव्या. अन्य मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा.

Claim Free Bets

“शेतकऱ्याना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्याचे आहे. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दोन ते तीन दिवसात सर्व शंभर टक्के पंचनामे होतील, आणि त्यांना योग्य ती मदत सरकारच्या वतीने दिली जाईल. स्वतः मी आणि उपमुख्यमंत्री यात लक्ष घालत आहोत,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Maharashtra School I राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु...

    June 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची म...

    राज्यात कोरोनाचा उद्रेक; निर्बंध नको असतील तर, शिस्त...

    June 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यात कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे...

    नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद...

    May 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर : राज्याच्या उपराजधानीत झिरो माईल पासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काटोल रोड स्थित बाळासाहे...