1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.’

Spread the love

चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मालेगाव, अमरावतीत, नांदेड या ठिकाणी दंगली झाल्या. याची चिंता न करता बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार भाजपवर आरोप करत आहेत. “मालेगावात दुसऱ्या दिवशीच्या दंगलीत हिंदूंच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत आमचा हात होता तर पहिल्या दिवशीच्या हिंसाचारात तुमचा हात होता हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात राजकारणाचे गुन्हेगारीकर होत चालले आहे,” अशी टीका पाटील यांनी ठाकरे सरकावर केली आहे.

आज भाजपची कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात अनेक आतापर्यंत अनेक गुन्हे झाले त्यातील गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांना अटक झाली आहे ते ठाकरे, महाविकास आघाडी सरकामधील नेत्यांचा समावेश आहे. तसेच मालेगाव, अमरावती, नंदुरबार या ठिकाणी दंगली झाल्या. या दंगली झाल्या कशा? यामागे कोण आहे याची चिंता न करता. त्यामागे भाजपचा हात असल्याचे या सरकारमधील नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत आहेत.

भाजपवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी एक लक्षात घ्यावे की, नांदेड, मालेगावात पहिल्या दिवशी जी सुरुवात झाली ती मुस्लिमांकडून झाली त्याच्यामध्ये जर भाजपचा हात आहे. मग दुसऱ्या दिवशी जी उत्स्फुर्त प्रतिक्रिया आली. हिंदूंनी समर्थन केले तर मग पहिल्या दिवशी शिवसेनेचा हात आहे हे स्पष्ट होते, हे संजय राऊतांना माहिती असावे. मलिक व संजय राऊत या दोघांचा मार्ग एकच आहे, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    2035 पर्यंत नेट झिरो कार्बन कंपनी बनण्याचं उद्दिष्ट;...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतातील हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हा सध्या जगापुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असून, त्याचे दुष्परिणा...

    वसूलीबाजीतून भरली स्वत:ची तिजोरी आणि जनतेच्या पदरी म...

    November 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकाही महिन्यातच आता राज्यात अनेक जिल्ह्यातील महानगर पालिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणूका पार पडणार आहे. त्याम...

    पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टला करावे लागेल 25 वर्षाचे...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वोच्च न्यायालयाने बुधवारी गेल्या २५ वर्षांपासून उत्पन्न आणि खर्चाचे केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ ...