1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिवसेनेचे पाय नागपुरात घट्ट रोवले पाहिजे: शिवसेना खासदार संजय राऊत

Shiv Sena-sanjay-raut-thefreemedia
Spread the love

नागपूर: शिवसेनेला नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजे. नागपूरमध्ये राज्याची
उपराजधानी असून हिंदुत्त्वाचा गड आहे. नागपूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढवणार आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नागपूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आज (२१ एप्रिल) राऊतांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील कामानिमित्ताने नागपूरला जाणार आहेत, असेही राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राऊत म्हणाले, ” नागपुरात शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजे. नागपूर राज्याची उपराजधानी असून हिंदुत्वाच शिवसेनेची ताकद वाढवणार आहोत. आमच्यासारखे नेते नागपूरमध्ये येतात तेव्हा लोक जमतात, आणि अनेक मान्यवर येतात. आम्ही सर्व पक्षांसोबत काम करण्याची इच्छा असून आता कसा आकार द्याचे हे पाहू. आदित्य ठाकरेही शासकीय कामासाठी जाणार असून पक्षप्रमुख देखील नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. २०२४ साली पक्ष मजबुतीच्या दृष्टीने उभे राहायचे असेल तर विदर्भात काम करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नव्याने काम सुरू झाले असून नागपूर महापालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना तयारी करत आहे.”

आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांना आज चौथ्या दिवशी चौकशी सुरू आहे, यासंदर्भात प्रकारांनी प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, “आयएनएस विक्रांत हा खूप मोठा घोटाळा आहे. आणि प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाईल. मुंबई पोलीस सक्षम असून बाहेर येऊन कोणी कितीही बडबड केली तरी लोकांना चुकीची माहिती दिली. पोलीस तपासात काय समोर येईल. आम्ही हवेत गोळीवाबर केलेला नाही. मी पुराव्यासह बोलतो आहेत. राज्यपालांच्या कार्यालयातून आलेले पत्र हा सर्वात मोठा पुरावा आहे. सोमय्यांनी जमा केलेला कोट्यावधी राजभवनात पोहोचलेले नाही. यानंतर हे पैसे कोणाच्या खिशात, जमिनीत गेले आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.

Claim Free Bets

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पवार साहेबांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्र...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं ह...

    JEE Main 2021 चा निकाल घोषित, 18 विद्यार्थ्यांना ...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 ट...

    महिलांवर अत्याचार व्हावेत हे कोणत्या सरकारला वाटतं; ...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेने देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघड...